Bookstruck

उंदीर आणि वडाची फळे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका वडाच्या झाडाखाली काही उंदीर रहात असत. एकदा त्यांना असे वाटले की, ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागते त्या त्या वेळी वडाची फळे खाण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडावर चढावे लागते. त्यापेक्षा ते झाडच खाली पाडले तर बरे होईल. असा विचार करून काही उंदीर त्या झाडाची मुळे कुरतडण्यास निघाले. तेव्हा काही शहाणे उंदीर त्यांना म्हणाले, 'अरे बाबांनो, तुम्ही जे करताहात, त्याच काय परिणाम होईल. हे लक्षात घ्या. एकदा झाड मोडून खाली पडल्यावर, पुढे जन्मभर आपल्याला जी फळं पाहिजेत, ती कोण देईल, याचा विचार केला का?'

तात्पर्य

- कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा दूरवर विचार केला पाहिजे.
« PreviousChapter ListNext »