आता निरोपाचे बोलणे संपले

आता निरोपाचे बोलणे संपले !

आत्म्याने अंकिले एकमेका

जीवीच्या धाग्यांची झाली एकजुटी

आता ताटातुटी-भाषा कैची ?

एकजीव झाले अवघ्यांचे भाव

का हो नाव-गाव उठाठेव ?

नव्या देणगीचा घेतलासे कुंभ

नये म्हणो थेंब वेगळाले

भावाबहिणींनो, झाली पाठवण

तरी आठवण संगे राहे