महात्मा

सांगायाचे होते सांगून टाकले

जावो ते ऐकले वा न जावो

कधीचा घेऊन दीप अंधारात

आहे मी चालत पुढे पुढे

येणारे येतील शोधीत ही वाट

आहे मी एकटा नाहीतरी

पाउलापुरता नाही हा प्रकाश

दूरचे भविष्य माझ्यापुढे

म्हणोत कोणी हे अरण्यरुदन

माझे समाधान चिरंतन !