Bookstruck

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

ज्‍या घरात नकारात्‍मकता असते, त्‍या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्‍मक बनते. असे व्‍यक्‍ती कोणत्‍याही कामाला सुरुवात करण्‍यापूर्वी नकारात्‍मक विचार करतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍या पदरी नेहमी अपयश पडते, त्‍यांचा मानसिक तणाव वाढतो व त्‍यांना पुरेशी धनप्राप्‍तीही होत नाही. पुरातन पंरपरेंमध्‍ये असे काही उपाय सांगितले आहेत, ज्‍यामुळे नकारात्‍मक विचार दुर होतात व घरातील सुख-समृद्धी वाढते.
जाणुन घ्‍या, ते ४ उपाय ज्‍यामुळे नकारात्‍मक विचार दुर होतात....

*पहिला उपाय*
रोज सकाळी घराबाहेर रांगोळी अवश्‍य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्‍मकता वाढते, अशी मान्‍यता आहे. यामुळे देवी लक्ष्‍मी आणि इतर देवी-देवता आपल्‍या घराकडे आकर्षित होतात.

*दुसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठा व आंघोळ झाल्‍यानंतर तांब्‍याच्‍या कलश पाण्‍याने भरा. यानंतर त्‍यामध्‍ये तुळशीची पाने टाका. नंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्‍यदार आणि सर्व खोल्‍यांमध्‍ये शिंपडावे. यामुळेही घरातील नकारात्‍मकता दुर होते.

*तिसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठल्‍यावर तुळशीच्‍या रोपट्याला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्‍णू मंत्रांचा जप करावा.
मंत्र-
*ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:*

*चौथा उपाय*
घरातील मंदिरात रोज सकाळी तूपाचा दिवा लावावा. कपूर जाळून देवाची आरती करावी. तूपाचा दिवा आणि कपूरच्‍या धुरामुळे घराची पवित्रता वाढते. वातावरण शुद्ध होते.

🕉  श्री स्वामी समर्थ 🕉

Chapter List