Bookstruck

ज्ञानप्राप्ती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या 'दिव्य ज्ञाना'ला 'संबोधी', 'बुद्धत्व' किंवा 'निर्वाण' असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण 'बुद्ध' असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. 'बुद्ध' म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली 'बुद्धत्व' प्राप्त झाले त्या वृक्षाला 'बोधी वृक्ष' (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

« PreviousChapter ListNext »