नवश्या गणपती,धुळे

महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना एके रात्री दृष्टांत झाला.

यानुसार त्यांनी कलेक्टरच्या बंगल्यातून दगडी गणेशमूर्ती शोधली.

ही गणेश मूर्ती त्यांनी पांझरा नदीकाठी आणून स्थापन केली. त्याच्या भोवताली छान असे मंदिर स्थापन केले.

या मंदिराचे त्यावेळचे पुजारी मुकुंद शर्मा यांची तिसरी पिढी या मंदिराचे व्यवस्थापन सांभाळत आहे.

१९२७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला.  धुळे बस स्थानकापासून नदीकाठी अगदीच पायी जाता येईल इतक्या अंतरावर हे मंदिर आहे.

मुंबई-धुळे रेल्वेने सुमारे ४५० कि.मी. अंतरावर आहे.