Bookstruck

सनातनींची सभा 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“या परिषदेचा हा संदेश. स्वातंत्र्याचे, समानतेचे, न्यायाचे विचार देणारे ब्राह्मण बना; स्वातंत्र्यासाठी लढणारे क्षत्रिय बना; देशाचा व्यापार वाढवून सर्वांना पोटभर अन्नवस्त्र मिळेल अशी व्यवस्था निर्मिणारे वैश्य बना; देशाची मनापासून सेवा करणारे शुद्र बना. ज्याची जी वृत्ती असेल ती त्याने समाजासाठी लावावी. स्वत:चे व समाजाचे कल्याण करावे. आणि शेवटी वैयक्तिक संसार अजिबात सोडून समाजसेवेस संपूर्णपणे वाहून घ्यावे. आणि मरताना विश्वाशी विलीन व्हावे.

“मी ही परिषद पुरी करतो फार बोलण्याची जरूरी नाही. मला ती शक्तीही नाही. तो प्रभू रामचंद्र सर्वांस सदबुध्दी देवो, सत्प्रेरणा देवो.”

आणि कोणीतरी उठून पटकन आभार मानले. सभा संपली. शेटजी निघून गेले. लोक घरोघर चालले. सारे अंतर्मुख होऊन चालले. अंतर्मुख होणे म्हणजेच धर्माचा आरंभ. त्यादृष्टीने ती सनातनी सभा अत्यन्त यशस्वी रीतीने पार पडली असे समजायला हरकत नाही.

« PreviousChapter ListNext »