Bookstruck

राजा यशोधर 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आदित्यनारायण, आपला राज्यकारभार दिवसेंदिवस अधीक चांगला व्हावा असे मला वाटते. राजा कितीही चांगला असला तरी त्याला जर अधिकारी चांगले मिळाले नाहीत, तर काय उपयोग ? कायदा शेवटी कागदावरच राहातो. ठायी ठायी चांगली माणसे काम करण्यासीठी कशी मिळतील हा मुख्य प्रश्न आहे. प्रत्येक गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला योग्य माणसे निवडली जातील, योग्य माणसे नेमली जातीला म्हणून काय करावे ?’

‘परंतु हल्लीचे अधिकारी आहेत ते चांगलेच आहेत. तक्रार कोठून येत नाही.’

‘माझ्या मनात एक योजना आहे. त्या त्या तालुक्यात जी बुद्धीमान, सदगुणी अशी मुले असतील, त्या सर्वांना राजधानीत बोलवावे. त्यांना तेथे वर्षभर शिक्षण देऊन त्यांची परीक्षा घ्यावी. केवळ बौद्धिकच परीक्षा नाही, तर इतरही अनेक अंगांची आणि जी मुले जास्त योग्य ठरतील ती ठिकठिकाणी नेमावीत.’

‘परंतु त्या त्या ठिकाणची हुशार, शहाणी मुले मिळणार कशी? समजायचा काय मार्ग ?’

‘त्या त्या गावच्या लोकांना माहीत असते. अमक्या अमक्याचा मुलगा फार हुशार आहे, फार परोपकारी आहे, असे गावात म्हणत असतात. त्या त्या गावच्या अधिका-यांनी नोंद करुन पाठवावी. आपण त्यांतून निवड करुन बोलावून घ्यावी. त्यांची परीक्षा घ्यावी. करुन तर पाहू या.’

‘करुन पाहायला काहीच हरकत नाही. पुढील राजांसाठी ही उत्कृष्ट परंपरा राहील. खरोखरच आपण धन्य आहात, किती सारखा विचार करीत असता!’

राजा होणे म्हणजे मोठी जोखीम. कोट्यवधी लोकांची सुखे राजावर अवलंबून असतात. एका कुटुंबाचा संसार नीट चालावा म्हणून त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला किती दक्ष रहावे लागते. मग ज्याच्यावर लाखो संसार अवलंबून, त्या राजाने किती बरे दक्ष राहिले पाहिजे? मघा ते वाद्य वाजत होते. माझ्या मनात विचार येई की, किती कुटुंबातून सुखाचे संगीत नांदत असेल ? कोठे हाय हाय तर नसेल ना ? अन्याय नसेल ना ? जुलूम नसेल ना ? अन्नान्नदशा नसेल ना? भांडणे, विरोध नसतील ना ? घरी-दारी, सर्वत्र भिन्नभिन्न सूर असूनही त्यांतून गुण्यागोविंदाने संगीत निर्माण होत असेल का? आदित्यनारायण

« PreviousChapter ListNext »