एका पर्वाचा अस्त


बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार  दुपारी ३.३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले

आयुष्यभर मुंबई आणि महाराष्ट्र त्याचप्रमाणे मराठी माणसा साठी लढलेले बाळासाहेब अखेरीच्या दिवसांत म्हणाले होते "गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या प्रकृतीत चढउतार होत आहेत , परंतु मी व्यवस्थित आहे, अफवा पसरवू नका असे खुद्द बाळासाहेबांनी जाहीर केल्यानंतर तमाम शिवसैनिकांच्या जीवात जीव आला होता.त्यांचे वयाच्या ८६व्या वर्षी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निधन झाले.

आजही बाळासाहेब आपल्याला सोडून कोठेही गेले नाहीत ते आपल्यातच त्यांच्या विचारधारेच्या माध्यमातून  जीवंत आहेत  असे सर्व सच्चे  शिवसैनिक मानतात.