Bookstruck

भूमि देवी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


जेव्हा ब्रम्हदेवाने विश्वाची रचना केली तेव्हा भूमी देवी त्यांच्याकडे गाय रूपाने आली. त्यांनी सांगितले की कसे त्यांना चांगले आणि वाईट यांच्यात संतुलन ठेवायचे आहे. ब्रम्हदेवाने तिला सांगितले की प्रत्येक युगानंतर वाईटाचे वर्चस्व वाढत जाणार आहे. त्यांनी सांगितले की सत्युगात चांगल्याचा वाईटाच्या वरती विजय कायम राहील त्यामुळे भूमिदेवी आपल्या चारही पायांवर उभी राहील. त्रेता युगात वाईटाचे वर्चस्व वाढेल आणि त्यामुळे भूमी देवीला एका पायाचा त्याग करावा लागेल. द्वापार युगात वाईटाच्या ओझ्याने पृथ्वी दाबली जाईल आणि केवळ दोन पायांवर उभी राहू शकेल. कलियुग असा काळ आहे जेव्हा वाईट आपल्या सर्व मर्यादा पार करेल आणि एका दानवाच्या रुपात पृथ्वीचे बाकीचे २ पाय कापून टाकेल. या गोष्टीमुळे पृथ्वीचे ते रूप समजते जेव्हा चांगले आणि वाईट एकमेकात असे मिसळून गेले की त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही.

« PreviousChapter ListNext »