Bookstruck

यमलोक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आत्मा सतरा दिवस प्रवास करून आठराव्या दिवशी यमलोकात पोहोचतो. यमपुरी किंवा यमलोकाचा उल्लेख गरूड पुराणात आणि कठोपनिषदात अगदी सविस्तर मिळतो. मृत्यूच्या बारा दिवसानंतर मानवाचा आत्मा यमलोकाच्या यात्रेवर निघतो. पुराणांनुसार यमलोकाला मृत्यूलोकाच्यावर दक्षिण दिशेला ८६,००० योजन अंतरावर मानलं गेलंय. एक योजन म्हणजे साधारण ४ किलेमीटर.
गरूड पुराणात या रस्त्यावर वैतरणीनदीचा उल्लेख आढळतो.  वैतरणी नदी विष्ठा आणि रक्ताने भरली आहे. ज्यांनी गौदान केले आहे ते या नदीला सहज पार करून यमलोकात पोहोचतात. अन्यथा ते या नदीत बुडत असतात आणि यमदूत त्यांना धक्के देत असतात.
 
यमपुरी पोहोचल्यावर आत्मा पुष्पोदका नावाच्या आणखी एका नदीजवळ पोहोचतो ची स्वच्छ असते, तिच्यात कमळ फुललेले असतात. याच नदीच्या काठी एक मोठे झाड असते ज्याच्या सावलीत आत्मा थोडावेळ विश्रांती करू शकतो. याच ठिकाणी त्याला त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या पिंडदान आणि तर्पणाद्वारे भोजन मिळते ज्यातून त्याला शक्ती मिळते.

« PreviousChapter ListNext »