Bookstruck

तिसरा दिवस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कौरवांनी गरुड आणि पांडवांनी अर्धचंद्राकार अशी व्यूहरचना केली होती. कौरवांकडून दुर्योधन आणि पांडवांकडून भीम आणि अर्जुन सुरक्षा करत होते. या दिवशी भीमाने घटोत्कचासोबत मिळून दुर्योधनाच्या सेनेला युद्धातून पळवून लावले. हे पाहून भीष्मांनी भीषण संहार करायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने अर्जुनाला भीष्मांचा वध करण्यास सांगितले, परंतु अर्जुन उत्साहाने लढू शकत नव्हता, ज्यामुळे श्रीकृष्ण स्वतः भीष्मांना मारण्यास उद्युक्त झाला, परंतु अर्जुनाने त्याला प्रतिज्ञारूपी आश्वासन देऊन कौरव सेनेचा भीषण संहार केला. त्याने एका दिवसातच प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव क्षत्रिय गणांना मारून टाकले.
भीमाच्या बाणाने दुर्योधन बेशुद्ध झला आणि त्याचवेळी त्याच्या सारथ्याने रथ तिथून पळवून नेला. भीमाने शेकडो सैनिकांचा खात्मा केला. या दिवशी देखील कौरावांनाच जास्त नुकसान सोसावे लागले. अनेक प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर योद्धे मारले गेले.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

« PreviousChapter ListNext »