Bookstruck

सोळाव्या दिवसाचे युद्ध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
द्रोणांचा कपटाने वाढ झाल्यानंतर कौरवांचा सेनापती कर्णाला बनवण्यात आले. कर्णाने पांडव सेनेचा भयंकर संहार केला आणि नकुल व सहदेवाला युद्धात पराभूत केले, परंतु कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्यांचे प्राण मात्र घेतले नाहीत. नंतर त्याने अर्जुनासोबतही भयंकर युद्ध केले.
दुर्योद्धानाच्या सांगण्यावरून कर्णाने अमोघ शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध केला. ही अमोघ शक्ती कर्णाने अर्जुनासाठी राखून ठेवली होती परंतु घटोत्कचाला घाबरलेल्या दुर्योधनाने कर्णाला ती शक्ती वापरायला सांगितली. ही अशी शक्ती होती की तिचा वार कधीही रिकामा जाणार नव्हता. कर्णाने ती अर्जुनाचा वध करण्यासाठी राखून ठेवली होती.
याच दरम्यान भीमाचे दुःशासनाशी युद्ध झाले आणि त्याने दुःशासनाचा वध करून त्याच्या छातीचे रक्त प्रश्न केले आणि तेव्हा सूर्यास्त झाला.
कौरव पक्षाचे नुकसान : दुःशासन
पांडव पक्षाचे नुकसान : घटोत्कच
कोण मजबूत राहिले : दोन्ही पक्ष
« PreviousChapter ListNext »