व्यापारी आणि शेतकरी
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पघड जातीच्या लोकांना एकत्र करून हे रयतेच स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त भारत देश नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी साठी प्रेरणास्थान ठरले आणि आज काही मूर्ख त्यांना विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवत आहे. सर्व महानपुरुषांना यांनी वाटून घेतलं आहे आणि अशी परिस्थिती निर्माण होण्यास फक्त आणि फक्त राजकारणी जबाबदार आहेत.
आपण सर्वजण म्हणतो.. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण आपण स्वतःच स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की खरंच आपण जात धर्म यापेक्षा आपल्या देशाला महत्व देतो का? की फक्त एक औपचारिकता म्हणून प्रतिज्ञा म्हणतो?